मुंबई – केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की, भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करून आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपने केवळ महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्याच नव्हे, तर तमाम हिंदूंच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. असं ट्विट करत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
१/२ केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे.आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. pic.twitter.com/67lBkTFe9d
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 14, 2023