कोलंबो :- भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आशिया करंडकाच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर होणाऱ्या सुपर-4 सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा पाकिस्तानच्या बाजूनं लागला आहे.(Pakistan win the toss and decide to field first) पाकचा कर्णधार बाबर आझम याने गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान,पहिल्या सामन्यात शाहिन आफ्रिदी व हरिस रौफ या गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याने भारताच्या अव्वल फलंदाजांना छळले होते. त्यामुळे या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर टिकण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे.
यापूर्वीच्या सामन्यात अव्वल फलंदजांनी निराशा केल्यानंतर इशान किशन व हार्दिक पंड्या या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करताना भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अखेर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने भारतावरील पराभवाची नामूष्की टळली होती.
दरम्यान, आजच्या सामन्यातही कोलंबोमध्ये 90टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात पावसाने प्रेक्षकांच्या उत्साहाच्या रंगाचा बेरंग केल्याने या सामन्यात तरी वरूनराजाने न पावण्याची प्रेक्षकांची इच्छा असणार आहे.