पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या डावातील 4.2 षटकांनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होताा. त्यानंतर पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा सामना थांबवण्यात आला आहे.
खेळ थांबला कतेव्हा भारताने 11.2 षटकात तीन विकेट गमावत 51 धावा केल्या आहेत. शुभमन गिलसोबत इशान किशन नाबाद आहे. गिलने 24 चेंडूत सहा आणि ईशानने सहा चेंडूत दोन धावा केल्या आहेत.
भारताला तीन धक्के..
दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर हरिस रौफने श्रेयस अय्यरला झेलबाद करून तिसरा धक्का दिला. अय्यर नऊ चेंडूत 14 धावा करून बाद झाला. भारतीय संघाने पहिल्या 10 षटकांत आपले तीन फलंदाज गमावले.
त्याआधी,सातव्या षटकात 27 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. शाहीन आफ्रिदीचा कहर दिसत आहे. रोहित शर्मानंतर त्याने विराट कोहलीलाही क्लिनबोल्ङ करत बाद केले. विराटला सात चेंडूत चार धावा करता आल्या. त्याचवेळी रोहितला 22 चेंडूत 11 धावा करता आल्या. शाहीनने सलग दोन षटकांत भारताच्या दोन प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
भारताला पहिला धक्का रोहितच्या रूपात बसला.पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने इनस्विंग चेंडूवर रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास?
या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेले दोन दिवस येथे वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचाच होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामना किमान 20 षटकांचा खेळवण्यात यश आले तर निकाल हाती येणार आहे. मात्र, ते देखील शक्य झाले नाही व सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. अशा स्थितीत सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव केलेला पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल मात्र, भारतीय संघाला पात्र होण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.