पाल्लेकेले :- भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे असते, असा प्रश्न नेपाळ विरुद्धच्या सामन्यानंतर काही पत्रकारांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विचारला असता रोहितने आपला संताप व्यक्त केला.
नेपाळचा पराभव करत आम्ही सुपर फोर गटात प्रवेश केला. तसेच आगामी काळात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी संघात काही प्रयोगही सुरू आहेत. त्याबाबत प्रश्न विचारा विनाकारण ज्या गोष्टींची कुठे चर्चाही नाही ते प्रश्न का विचारता, असा उलट सवालही रोहितने या पत्रकारांना केला.
सध्या संघ अपेक्षित कामगिरी करत आहे व विश्वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे अशा वेळी कोणते प्रश्न विचारावेत याचे भान पत्रकारांनाही असावे, असा टोलाही कर्णधार रोहित शर्मानं लगावला आहे.
दरम्यान, टीम इंडिया आता 10 सप्टेंबरला सुपर फोर फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे. यानंतर भारताला 12 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत.
सुपर फोरमध्ये चारही संघ आमनेसामने असतील. अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया चषक 2023 चा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.