मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात उतरलेत. राज्यातील व देशातील कोरोना संकट लक्षात घेता राज्यातील प्रमुख पक्ष ही निवडणूक बिनविरोध पार पाडतील अशा शक्यता वर्तविण्यात येत होत्या मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी प्रत्येकी २ तर भाजपने ४ उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.
अशातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करायची असल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी काँग्रेसची मनधरणी करावी असा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना, ‘जर राज्यातील इतर प्रमुख पक्ष विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यास तयार असतील तर भाजपही त्यासाठी तयार असेल. संख्याबळाप्रमाणे आम्ही ४ जागांवर विजय मिळवत असून तेवढ्याच जागा लढवत आहोत.’ असं सांगितलं.
दरम्यान, राज्यातील विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडाल्याची माहिती असून काँग्रेसतर्फे या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार उतरवण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
If every (major) party agrees on unopposed elections to Maharashtra Legislative Council, BJP will also agree. BJP has fielded 4 candidates according to its strength. If unopposed elections are to happen, the CM would have to take the Congress along: BJP leader Ashish Shelar pic.twitter.com/RbFMgSAFU9
— ANI (@ANI) May 10, 2020