Ashish Shelar। राज्यातील मराठा आंदोलनाचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचे दिसले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी जरांगेच्या आंदोलनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावेळी सभागृहातून त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? हा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
एसआयटीमार्फत चौकशीची मागणी Ashish Shelar।
विधानसभेत मनोज जरांगेच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत आशिष शेलार यांनी, महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळं जरांगे यांच्या मागे कोण आहे? ते समोर येण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशीची मागणी आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांचे अनेक प्रश्न Ashish Shelar।
मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासूनच आपण मान्य केल्या. परंतु आता जरांगे यांची भाषा बदलली. आता ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागलेत. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकरी उल्लेख केला गेला. आतापर्यंत कुठेही फडणवीस यांचे वात्रट भाषण झाले नाही. त्यांनी कायदा आणि संविधाननुसार भाषण केले आहे. त्यावर आता जरांगे म्हणतात, तुला निपटून टाकू. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय म्हणतो, तुम्ही गांभीर्याने घ्या. शांत बसू नका. मराठा समाजाच्या पाठिशी आम्ही आहोत. परंतु ही भाषा करण्याची हिंमत आली कोठून.? असा सवाल त्यांनी केला.