रायगड – इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज सकाळीच रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होत.
तर यातच सूत्रांच्या माहितीनुसार. मुंबई पोलिसांकडून अर्णव गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याविरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हटले आहे अन्वय नाईक यांच्या मृत्युपूर्व चिठ्ठीत ?
अर्णव गोस्वामी यांनी 83 लाख रुपये थकवल्याने आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्या चिठ्ठीत या साऱ्या प्रकरणाचा तपशिलाने नोंद करण्यात आली आहे.