पुणे – मार्च महिन्यात या वर्षातील उन्हाच्या झळांचा उच्चांक नोंदवला असतानाच एप्रिलमध्ये हा विक्रम मोडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या विविध भागांत मार्चपासून चार ते पाच वेळेला उष्णतेच्या लाटा आल्या आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बसला आहे.
त्यात आता पुढील दोन ते तीन दिवसांनंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाट येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यात प्रामुख्याने जळगाव, नगर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवकमाळ या जिल्ह्यांत लाट तीव्र असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.