विद्यार्थी, शाळा व राज्य मंडळाच्या निर्धारामुळे परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या. परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे. करोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही अनेक आव्हानाला सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वीपणे लावण्यात यश आले आहे.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीने कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. मुलांपेक्षा मुलीच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 2 टक्के अधिक आहे. ही समाधानाची बाब आहे. पुढील करिअरबाबत विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री