नवी दिल्ली – देशात करोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. यानंतर रामदेव बाबांनी माघार घेतली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केल आहे. यासंदर्भात उपचार पद्धितींच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा यांनी सांगितले होते.
IMA Uttarakhand sends a defamation notice of Rs 1000 cr to Yog Guru Ramdev. The notice states that if he doesn’t post a video countering the statements given by him and tender a written apology within the next 15 days, then a sum of Rs 1000 crores will be demanded from him. pic.twitter.com/c7RlLInXi3
— ANI (@ANI) May 26, 2021
मात्र आता बाबा रामदेव पुन्हा अडचणीत सापडले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामदेव बाबा यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. तसेच कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले आहे. ‘
रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य –
“अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” करोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन निकामी ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही निकामी ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हणाले होते. विशेष म्हणजे करोना रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता. एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात होता. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाले बाब रामदेव, ”’डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे.” यासंदर्भात बाबा रामदेव यांनी ट्वीट केले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहिले होते. यामध्ये “संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं.” या पत्राला त्यांनी आज उत्तर दिले आहे.