Andhra CM injured । आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट लागल्याची माहिती समोर आलीय. याठिकाणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना घडलीय. विजयवाडा याठिकाणी प्रचारादरम्यान ही घटना घडलीय.
जगनमोहन रेड्डींच्या डोक्याला दुखापत Andhra CM injured ।
जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक प्रचारासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा सुरू केलीय. ही यात्रा आज शनिवारी रात्री विजयवाडा पोहोचल्यावर ते लोकांना अभिवादन करत होते. त्याचवेळी यांच्यावर दगडफेक झाली. जगनमोहन रेड्डींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. बसमध्येच डॉक्टरांनी जगनमोहन रेड्डींवर प्रथमोपचार केले. प्रथमोपचारानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांची बस यात्रा चालू केली.
#WATCH | Lok Sabha Elections 2024 | Vijayawada: Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy injured during Memantha Siddham Bus Yatra.
According to YSRCP, an unidentified individual pelted a stone at the CM, injuring him on his left eyebrow. His security team was alerted and it… pic.twitter.com/kfBFlMpnhp
— ANI (@ANI) April 13, 2024
जगनमोहन रेड्डी विजयवाडामधील सिंहनगर येथे रोड शो करत होते. त्यांची ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा तिथे दाखल झाली होती. त्यावेळी बसवर चढून जगनमोहन रेड्डी लोकांना अभिवादन करत होते. तसेच लोकांचा जल्लोष पाहत होते. त्यांचा ताफा विवेकानंद शाळेजवळ पोहोचला. त्याच ठिकणी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. यावेळी एक दगड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ लागला. जखम झाली. जखमेतून भळाभळा रक्त वाहू लगलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक आणि वायएसआरच्या पदाधिकाऱ्यांनी जगनमोहन रेड्डींना बसमध्ये नेलं.
आमदार वेल्लमपल्लीदेखील जखमी Andhra CM injured ।
बसमध्येच त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. प्रथमोपचार घेतल्यानंतर जगनमोहन यांनी पुन्हा एकदा लोकांना अभिवादन केलं आणि त्यांची बस यात्रा पुढे नेली. जगनमोहन रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दगड लागून गंभीर इजा झाली आहे. तिथे उपस्थित पदाधिकारी वेल्लमपल्ली यांना घेऊन त्वरीत रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, हा हल्ला तेलुगू देसम पार्टीच्या लोकांनी घडवून आणला होता.