Andheri Bypolls – एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात पहिलीच मोठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके ( Ramesh Latke ) यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. यामुळे अंधेरी पूर्वच्या जागेसाठी येत्या ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rutuja Latke ) यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला नसून त्यांनी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. मुरजी पटेल ( Murji Patel ) यांनी आज आपली उमेदवारी दाखल केली. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पटेल यांच्यासमवेत भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) देखील उपस्थित होते. राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप करताना आदित्य ठाकरेंनाही ( Aditya Thackeray ) इशारा दिला.
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरेनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “ही निवडणूक एकतर्फी आहे. रमेश लटकेंचं काम कोणीही नाकारणार नाही. पण मातोश्रीमध्ये त्यांचा किती अपमान झाला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उलचत नाहीत, भेटत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. माणूस जिवंत असताना तुम्ही किंमत देत नाही आणि नंतर तुमच्या घाणेरडया राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करता,”
अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपात प्रवेश
आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर… | Nitesh Rane Andheri Bypolls
“रमेश लटके आज जिवंत असते तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे असते,” असा दावा यावेळी नितेश राणे यांनी केला. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले “सर्वात जास्त मानसिक त्रास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटंबाने दिला आहे. याचे अनेक पुरावे आहेत. आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत”.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे… | Aditya Thackeray Andheri Bypolls
अंधेरी पोटनिवडणुकीवरून रंगलेल्या राजकारणावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील राजकारण बभलतीकडेच चालल्याचा आरोप लगावला होता. ते म्म्हणाले, “अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. शिवतीर्थ असो किंवा लटकेंची लढाई, पालिकेवर हुकूमशाहीचा दबाव आहे. हे राजकारण भलतीकडे चाललं आहे. यातून खोके सरकार निर्दयी असल्याचं समोर येत आहे. माणुसकी विरुद्ध खोकासूर अशीच ही लढाई झाली आहे,”
उद्धव ठाकरेंची अग्नी परीक्षा? | Uddhav Thackeray Andheri Bypolls
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर मूळच्या शिवसेनेचे बहुतांश आमदार,, खासदार त्यांच्यासमवेत गेले आहेत. असं असलं तरी उद्धव ठाकरे व त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांकडून सामान्य शिवसैनिक आजही आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. तसेच सामान्य नागरिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानभूती असल्याचं देखील बोललं जातंय. अशातच अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागल्याने या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही याचीच परीक्षा होणार आहे.
२०१४ पासून शिवसेनेचं वर्चस्व | Shivsena
२०१४ पासून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. २०१४ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते. त्यावेळी, रमेश लटके यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत भाजपच्या ललनप्रसाद यादव यांचा पराभव केला होता. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती झाल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. २०१९ मढयेही रमेश लटके यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी आता लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार असलेले मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.