अयोध्या : प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये श्रीराममंदिर उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या मंदिराला अभेद्य सुरक्षा कवच पुरवण्यात आले आहे. मंदिरावर हल्ला करण्याबाबत सतत निनावी फोन आणि पत्र येत असल्याचा पार्श्वभूमीवर सहा स्तरीय सुरक्षा यंत्रणेची रचना मंदिराच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. 70 एकर परिसरात राम मंदिराची उभारणी करण्यात आली असून या सर्व परिसराला नो फ्लाईंग झोनही जाहीर करण्यात येणार आहे.
हेलिकॉप्टर विमान किंवा ड्रोनही या परिसरात उड्डाण करू शकत नाही. मंदिराच्या सुरक्षा जबाबदारी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे स्वीकारली असून त्यांनी सहा स्तरीय सुरक्षा यंत्रणेची रचना केली आहे. या सुरक्षा यंत्रणात तीन झोनमध्ये विभागण्यात आली असून त्याला रेड झोन,यलो झोन आणि ग्रीन झोन असे नाव देण्यात आले आहे. रेडझोन मध्ये प्रत्यक्ष मंदिर आणि आसपासचा परिसर आहे.
येलोझोनमध्ये या मंदिराच्या दिशेने येणारे सर्व रस्ते समाविष्ट आहेत ग्रीनझोनमध्ये बाहेरील सर्व क्षेत्र परिसर आणि रस्ते आहेत. या तीनही झोनच्या परिसरामध्ये स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ चे जवान 24 तास लक्ष ठेवून आहेत भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचायचे असेल तर तीन पद्धतीने त्यांची तपासणी केली जात आहे आणि केवळ एकाच मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचू शकता कोणत्याही इतर मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचता येत नाही. मंदिरामध्ये येताना कोणतीही वस्तू किंवा पूजा सामग्री आणण्यास संपूर्णपणे मनाई करण्यात येईल आली आहे.
मंदिराच्या परिसराच्या बाहेर असणारी दुकाने आणि स्थानिक नागरिक यांची सातत्याने चौकशी केली जाते. त्यांच्याकडे संपर्कात असलेल्या व्यक्ती त्यांच्याकडे राहणारे व्यक्ती किंवा भक्त यांची संपूर्ण माहिती त्यांना पोलिसांना द्यावी लागते. कोणत्याही नागरिकाच्या घरी एखादा समारंभ असेल त्या समारंभाची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. या समारंभाला कोणत्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी लागते या परिसरात एकूण 350 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले असून त्यावर सतत नजर ठेवण्यात येत आहे.
अतिविशिष्ट व्यक्ती जरी मंदिराला भेट देण्यासाठी आली तरी त्या व्यक्तीला एकटे मंदिरात सोडता येत नाही. सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत जातात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची वाहने सुद्धा खूप दूर उभी करावी लागतात. महत्वाची गोष्ट म्हणजे या सुरक्षा यंत्रणेचा सतत आढावा घेतला जातो आणि त्याचा रिपोर्ट वरिष्ठांना सादर केला जातो. गेल्या काही दिवसात निनावी पत्राच्या माध्यमातून किंवा डार्क नेटच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याच्या धमक्या मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.