अकोला – मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र तसे काही न झाल्यामुळे मुंडे समर्धकांनी राजीनाम्याचे सत्र चालू केले. याला विराम देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे.
ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.
"नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.@Pankajamunde— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 13, 2021
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पाच पांडव का जिंकले, कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो, तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हापर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही.
यावर अमोल मिटकरी म्हणाले की, ”ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.”नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.”