Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर जनतेला संबोधित करताना बिहारच्या महाआघाडी सरकारवर हलबॉल केला. नरेंद्र मोदींना विरोध करण्याचा इंडिया आघाडीचा एकच अजेंडा असल्याचे अमित शहा म्हणाले. नितीशकुमार भ्रष्ट लोकांसोबतच सत्तेचा आनंद उपभोगत आहेत. आज ते लालूंसोबत बसले आहेत. तुम्हाला हे ठरवायचे आहे की तुम्हाला 2G घोटाळा करणारी इंडिया आघाडी हवी की 5G पुरवणारी मोदी सरकार.’ असं म्हणत शहा यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
आज जेव्हा मी उत्तर बिहारमध्ये आलो आहे तेव्हा, 2024 मध्ये 40 पैकी 40 जागा मोदींच्या झोळीत टाका. 2025 मध्ये बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन करायचे आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला तेव्हा एका पल्टू रामने (नितीश कुमार) जनादेशाचा विश्वासघात केला. अमित शहा यांनी जनतेला विचारले की तुम्ही लालूंच्या जंगलराजच्या विरोधात मतदान केले की नाही? या पलटुरामने पंतप्रधान होण्यासाठी बिहारच्या जनादेशाचा विश्वासघात केला. बिहारमध्ये जंगलराज देण्याचे काम नितीशकुमार यांनी केले आहे. असेही अमित शहा म्हणाले
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली G20 चे आयोजन करण्यात आल्याचे अमित शहा म्हणाले. दिल्लीचा जाहीरनामा एकमताने स्वीकारून सर्व देशांनी नरेंद्र मोदींचा गौरव केला. गृहमंत्र्यांनी बैठकीला आलेल्या लोकांना विचारले की,’ काश्मीर आमचे आहे की नाही? कलम ३७० हटवायला हवे होते की नाही? अनेकांनी विरोध केला होता. रक्ताच्या नद्या वाहतील असे म्हटले होते. लालू यादव यांचे नाव घेत ते म्हणाले की, रक्ताच्या नद्या सोडा, खडे टाकण्याचे धाडस कोणात नाही. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून सर्वांना सरळ करण्याचे काम केले. चंद्रावर तिरंगा फडकवला. संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. महिलांना आरक्षण दिले.’