नवी दिली : अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षावरून देशभरात रान उठले आहे. याच मुद्दयावरून आता विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेसने याच मुद्द्यावरून आज संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. यावरूनच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे.
भारतीय सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर अली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र उगारले होते. दरम्यान, आज याच मुद्द्यावरून आता अमित शाह यांनी २००६ – ०७ साली काँग्रेसने चिनी दूतावासाकडून 1.35 कोटी रुपयांचे अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या नियमानुसार हे योग्य नव्हते त्यामुळेच त्यांच्या फाउंडेशनचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचेही शाह यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | Today there is a BJP government in the country. As long as our govt is there no one can capture even an inch of land. I salute the valour shown by our Indian Army troops on the intervening night of December 8-9 (in Arunachal Pradesh): Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/hsBTJv8dcN
— ANI (@ANI) December 13, 2022
त्याच बरोबर जोपर्यंत भाजपचे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत एक इंच जमीन कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही, असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. आज देशात भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत एक इंचही जमीन कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही. 8-9 डिसेंबरच्या मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याला मी सलाम करतो, असे म्हटले.