मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 20 हजार 697 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच राज्यात 1 लाख 245 गुन्ह्यांची नोंद झाली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.22 मार्च ते 8 मे 2020 या कालावधीत 1 लाख 245 गुन्हे नोंद झाले असून 19 हजार 297 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 76 लाख 53 हजार 694 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.