प्रतापगड – दहशतवादी कारवायांचे आरोप असलेल्यांवरील खटले मागे घेऊन अखिलेश यादव यांनी जनतेचा विश्वासघात केला, अशा शब्दामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जारदार टीकास्त्र सोडले आहे.
अखिलेश यादव नेहमीच विकासाबद्दल बोलत असतात. आतापर्यंत त्यांनी आपल्या कुटुंबाचाच विकास केला. मात्र आता त्यांना उत्तर प्रदेशच्या विकासाची चिंता आहे. ते विकास नाही तर विनाश करतील, असे नड्डा म्हणाले.
अखिलेश यादव यांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तर प्रदेशात 200 दंगली झाल्या. 2007 साली गोरखपूर, लखनौ, वाराणसी आणि अयोध्या कोर्टाच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांवरील खटले का मागे घेतले गेले. याचे उत्तर अखिलेश यांना द्यावे लागेल, असेही नड्डा म्हणाले.
समाजवादी पार्टीच्या सरकारने रामभक्तांवर गोळीबार केला होता आणि कॉंग्रेसने राम जन्मभूमीचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याची टीकाही नड्डा यांनी केली.