Akali Dal-BJP Alliance। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एनडीए आपल्या गटाचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दल यांच्यात पंजाबमध्ये युतीबाबत काही काळ चर्चा सुरू होती. आता मोठी बातमी समोर येत आहे, त्यानुसार पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप युतीची चर्चा फेल झालीय.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकत्र निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने आपली रणनीती बदलली आहे. शेतकरी आंदोलन आणि शीख कैद्यांच्या सुटकेबाबत अकाली दल भाजपवर दबाव टाकत आहे. याशिवाय पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या बाजूने नव्हते.
या कारणामुळे भाजप-अकालीचे मार्ग वेगळे Akali Dal-BJP Alliance।
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवे कृषी कायदे आणले तेव्हा त्याचा निषेध म्हणून अकाली दलाने एनडीएशी संबंध तोडले. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत युती करून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर भाजप आणि अकाली दलचे मार्ग वेगळे झाले होते.
यामुळे गोष्टी बिघडल्या Akali Dal-BJP Alliance।
भाजप पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांपैकी 6 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करत आहे, तर अकाली दल इतक्या जागा देण्यास तयार नाही. अकाली दल जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा तो 10 जागांवर निवडणूक लढवत होता आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत होता.
पंजाबमध्ये सध्या अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती आहे. पंजाबमध्ये बसपचा चांगला प्रभाव असल्याने त्यांना ही युती तोडायची नसल्याचे बोलले जात आहे. सुखदेव सिंह धिंडसा यांचा गटही अकाली दलात सामील झाल्याची चर्चा आहे.
त्याचवेळी भाजपने पंजाबमध्ये अकाली दलाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अकाली नेत्यांनी केला आहे. भाजपने अकाली दलातील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्ट केले. जेणेकरून अकालीची व्होटबँक त्यात हस्तांतरित होईल. जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपने चरणजित सिंह अटवाल यांचे पुत्र इंदर सिंग अटवाल यांना उमेदवारी दिली होती.