मुंबई – बागेश्वर धमाचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी आजपर्यंत अनेक विधाने केली आहेत ज्यामुळे देशात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कचाट्यातदेखील अडकावे लागले आहे. दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी एक विधान केले आहे ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
एका कार्यक्रमात शास्त्री यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता” (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) असे म्हटले. तसेच यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
दरम्यान, अश्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा धीरेंद्र शास्त्री यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले. त्यावर “या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका. हे भोंदूबाबा आहेत..’ असं अजित पवारांनी म्हंटलं आहे.
नेमकं साईबाबांविषयी धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले होते, वाचा….
साईबाबांविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असो अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार आहे.’ असे म्हणाले.
पण पुढे बोलताना शास्त्री यांनी, कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.
परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही”. असे त्यांनी म्हटले.