मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज अखेर सुटला असून देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळची गोपनियेत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील जनतेशी सवांद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस ‘मोदी है तो मुमकिन है’ची घोषणा दिली तसेच, अजित पवार यांच्या समर्थनातून राज्याला एक मजबूत सरकार देणार असल्याची घोषणा केली.
Maharashtra CM Devendra Fadnavis in Mumbai: We will provide a stable government. Modi hai toh mumkin hai!! pic.twitter.com/vpIWe7fl6h
— ANI (@ANI) November 23, 2019