मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण करणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात एकच खळबळ माजली आहे. आता अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबिय आणि पक्षांत उभी फूट पडली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्यात तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? माझ्या आयुष्यात कधीही इतकी फसवणूक झाल्याचे वाटले नाही, पाठराखण केली, प्रेम दिले त्याबदल्यात परत काय मिळाले? असं स्टेटस ठेवत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.