मुंबई – गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता स्थापनेचा पेच आज अखेर सुटला आहे. आज राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Nirupam: People would be thinking I will be happy by today’s developments,but I am actually very sad. Congress has been unnecessarily defamed in this and thinking of alliance with Shiv Sena was a mistake. I appeal to Sonia ji to at first dissolve Congress Working Committee pic.twitter.com/dvg9sEBCDB
— ANI (@ANI) November 23, 2019
निरूपम म्हणाले की, ” महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींवर मी खूश असेल असे लोकांना वाटत असेल. परंतु, मी खूप दु:खी आहे. महाराष्ट्रातील या राजकारणाने काँग्रेसला नाहकपणे बदनाम आणि कमजोर करण्याचे षडयंत्र सुरू आहे. शिवसेनेसोबत जाण्याची काँग्रेसची खूप मोठी चूक होती. निरूपम पुढे म्हणाले की, मी सोनिया गांधींना आवाहन करतो की, त्यांनी काँग्रेसची कार्यकारणी विसर्जित करावी. तसेच राहुल गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व करावे”. दरम्यान, संजय निरूपम यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.