मुंबई – राज्यात पुन्हा वीजदर वाढ केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काही अंशी दरवाढ करण्याचे सूतोवाच आधीच केले आहे. मात्र, या वीज दरवाढीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेचा दर वाढता नये असे म्हंटले आहे. दरम्यान महावितरण पार बुडीत अवस्थेत गेली आहे. त्यामुळे महावितरणने 35 टक्के दरवाढ मागितली आहे. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर पडणार आहे. मात्र, गरीब व लहानांना सवलत देत असताना इतरांच्या विजेचा दर वाढवता कामा नये. याचा विचार केला पाहिजे,वीज दरवाढीचा प्रस्ताव अजून माझ्यापुढं आलेला नाही. मात्र, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण खाजगीकरण ?
सार्वजनिक वीज क्षेत्राला खासगीकरणाचे ग्रहण लागले असून राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. ऊर्जा विभागाकडून याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती मिळतेय. हा परवाना मिळवण्यासाठी तीन खासगी कंपन्यांचे प्रयत्न सुरु असल्याचंही समजतंय. या संबंधित खासगी कंपन्यांनी विविध शहरांमधील वीजग्राहकांची संख्या, त्यांचा वीज वापर, मासिक बिल याची माहिती काढण्यास सुरुवात केलीय. खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना दिल्यास त्याला राज्यभरातील वीज कामगार तीव्र विरोध करतील असा इशारा देण्यात आलाय.