मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघा निवडणुकांवरून राज्यात राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. याच गोंधळावर अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी हा कट रचण्यात आला. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, असे गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केले. तांबे यांच्या या आरोपानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, आमची चूक झाली, सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे विधान केल्याचे समोर आले आहे. ते बारामतीमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. “शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले,” असे अजित पवार म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांविषयी बोलताना, “शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले,” असे अजित पवार म्हणाले.
“आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशीक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात मी लुडबूड करण्याचे काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेसला सुलटलेली होती,” असेही अजित पवार म्हणाले.