मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा ठप्प होत्या. त्यामुळे भारतीय संघाला दीर्घ कालावधीत प्रत्यक्ष सामने खेळण्याचा सराव फारसा मिळाला नाही. बीसीसीआयने तसेच अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत गंभीर विचार केला नाही. त्यामुळे खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही, अशा शब्दांत अजिंक्य रहाणे याने बीसीसीआय व गांगुली यांच्यावर टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने एतिहासिक विजय मिळवला. त्यात आपण घेतलेल्या निर्णयांचे श्रेय अन्य व्यक्तीने लाटले असे वक्तव्य केलेल्या रहाणेने आता थेट गांगुलीसह बीसीसीआयशीही पंगा घेतला आहे.
जगभरात करोनाचा धोका वाढत असताना लॉकडाऊन लावले गेले हे मान्य. मात्र, जेव्हा विविध स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळीही रणजी करंडक स्पर्धेसह काही स्पर्धा आयोजित करणे बीसीसीआयला शक्य होते असेही रहाणेने सांगितले.