राहाता – शिर्डी येथील काशीकानंद महाराज यांच्या दिंडीत मालवाहतूक ट्रक घुसल्याने झालेल्या अपघातात ताराबाई गमे,भाऊसाहेब जपे,बबन थोरे,बाळासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचे अपघाती निधन झाले त्यांना राहता येथील मारुती मंदिरात आयोजित शोकसभेत ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महामार्गांने दिंडी जाण्यासाठी प्रशासनाने दिंडीसाठी वेगळी व्यवस्था करावी कारण पंढरपूर,देऊ आणि आळंदी या देवस्थानाकडे पायी दिंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर जात असते. यापूर्वी सुद्धा पायी जाणाऱ्या दिंड्यांचे मोठे अपघात होऊन वारकरी ठार झाले तर काहीना कायमचे अपंगत्व आले. वारकऱ्यांच्या दिंड्यांना अधिक वाहतुकीच्या रस्त्यावर पोलीस संरक्षण दिले जावे मृत वारकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करावी अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या.
भजन गायक सामाजिक कार्यकर्ते बंडू नाना वाबळे व हनुमान चालीसा सेवा मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे व मारुती बाबा भजनी मंडळाचे सुरेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या सभेचे आयोजन केले गणेश कारखान्याचे माजी संचालक मोहनराव सदाफळ,भाजपचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा,वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे,माजी नगराध्यक्ष डॉ के.वाय.गाडेकर,गणेशचे संचालक भगवान टिळेकर, माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर,शशिकांत लोळगे, ॲड.भाऊसाहेब सदाफळ, पत्रकार रामकृष्ण लोंढे, चांगदेव पाडेकर,सुनील लोंढे कीर्तनकार संतोष दीक्षित,दादासाहेब गायकवाड यांची यावेळी श्रद्धांजली भाषणे झाली यावेळी अशोक वाबळे पत्रकार दिलीपजी खरात,श्रीकृष्ण खिस्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.