संगमनेर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून लाखोंच्या संख्येने समाजबांधव सोबत आहेत. या मोहिमेसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीपासून मुंबईच्या दिशेने नगरमार्गे आगेकूच करणाऱ्या मराठा फौजेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संगमनेरमधील सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे. सुमारे 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या संगमनेरमधून नगरच्या दिशेने रवाना झाल्या असून, आणखी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था सकल मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे.
मराठा समाजाचा वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत ठेवणारे जरांगे पाटील आता आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी लाखोंच्या संख्येने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ लवकरच मुंबईत धडकणार आहे. रस्त्याने जाताना मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून संगमनेर सकल मराठा समाजाने एकत्र येत पिण्याच्या बाटल्यांचे बॉक्स संकलित करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ट्रकद्वारे नगरला जरांगे पाटलांच्या रॅलीपर्यंत पाठविण्यात आल्या आहेत.पाहणे महत्वाचे ठरणार आहे.