नवी दिल्ली – काँग्रेसची भारत जोडो यात्रा ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा आज उत्तर प्रदेश (UP) मध्ये दाखल होणार आहे. भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा पाठिंबा मिळाला आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सत्येंद्र दास यांनी पाठिंबा दिला आहे. अयोध्या काँग्रेसचे एसके गौतम यांनी सांगितले की, सत्येंद्र दास यांनी पत्रात लिहिले आहे की, त्यांना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे होते, परंतु त्यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे ते त्यात सहभागी होऊ शकले नाहीत.
सोमवारी (२ जानेवारी) रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. देशाला जोडण्याचा तुमचा प्रवास पूर्ण व्हावा, या प्रवासात तुम्ही जे ध्येय घेऊन जात आहात ते पूर्ण व्हावे, देशहितासाठी तुम्ही जे काही कार्य करत आहात ते यशस्वी व्हावे, असे मुख्य पुजाऱ्यांनी हे पत्र लिहिले होते. त्यांनी पुढे लिहिले की, तुमचा प्रवास यशस्वीपणे त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.