नवी दिल्ली : नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात सरकारने वृत्तपत्रांत जाहिराती देऊन अफवा टाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) बद्दल चुकीची माहिती देऊन गोंधळ होऊ नये, असे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.
या कायद्याशी संबंधित अनेक प्रकारच्या अफवा आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे, परंतु हे कोणत्याही प्रकारे सत्य नाही. सीएएशी संबंधित वास्तविक तथ्यांचा या जाहिरातींमध्ये समावेश आहे.
या जाहिरातीमध्ये सरकारने कायद्याचे सत्य आणि त्यासाठी निर्माण होणाऱ्या गोंधळाची माहितीही दर्शविली आहे. ज्यामध्ये हे देखील पुनरुच्चारित केले गेले आहे की सीएए भारतीय नागरिकांकडून त्यांचे नागरिकत्व काढून घेण्याच्या उद्देशाने नाही.
या कायद्याने कोणत्याही धर्माच्या विद्यमान भारतीय नागरिकांवर परिणाम होत नाही. २०१४ पर्यंत भारतात राहणा-या अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्याशी संबंधित हा कायदा आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही.
या कायद्याबद्दल अफवा पसरल्या जात आहेत की, सीएएचा परिणाम भारतीय मुस्लिमांवर होऊ शकतो. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा कोणत्याही प्रदेशातील किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या भारतीय नागरिकावर विपरीत परिणाम होणार नाही अशी जाहिरात वृत्तपत्रात छापण्यात आली आहे.