मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसची कालची सातारा येथील सभा ही खऱ्या अर्थाने ‘पवार आणि पाऊस’ या दोघांमुळेच गाजली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि तुफान पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली.
दरम्यान, यावर युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ‘आदित्य ठाकरे’ यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी शरद पवारांवर वैयक्तिक टीका कधीच केली नाही. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र आहेत. काल त्यांनी जोरदार पावसात भिजून सुद्धा सभा घेतली, ते खरंच सगळ्यांनी कौतुक करण्यासारखं आहे.” असं आदित्य म्हणाले.