काटेवाडी – अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी नवी मुंबई येथील सागर पवार यांनी नेरूळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे. आज काटेवाडी येथील माजी सरपंच विद्याधर काटे, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, सागर भिसे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी इंदापूर या ठिकाणी सागर पवार यांचे भव्य स्वागत केले.
नवी मुंबई येथील नेरूळ ते तुळजापूर असा पायी चालत जाण्याचा निर्णय एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला त्याचे नाव सागर पवार, 15 नोव्हेंबरला बलप्रतीपदेच्या मुहूर्तावर सागर पवार यांनी नेरूळ पासून तुळजापूर पर्यंत पायी चालत जाण्याचा निर्णय घेऊन पायी चालत जाण्यास सुरुवात केली.
केवळ अजित पवार यांना आपले दैवत मानणारा हा कार्यकर्ता असल्याने अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळी छाप निर्माण झालेली आहे. धडाडीचा व कार्य कुशल नेतृत्व करणारा विकासाचा महामेरू समजला जाणारा नेता म्हणजे अजित पवार व याच प्रेरणेने अनेक तरुण वर्ग अजित पवार यांच्याकडे आकर्षिला जात आहे.
अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांच्या सडेतोड बोलण्यावर व कायमस्वरूपी जे काम होणार आहे ते करून दाखवण्याची धमक असणारा एकमेव नेता म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. या अशा नेत्याला आजपर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान मिळाला. परंतु या अशा कर्तुत्ववान नेत्याला मुख्यमंत्री झालेले राज्यातील सर्व जनतेला पाहिजे आहे. म्हणूनच ही जनतेची इच्छा पूर्ण होण्यासाठी सागर पवार याने नेरूळ ते तुळजापूर पर्यंत पदयात्रा काढून तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला अभिषेक करून साकडे घालणार आहे की या आमच्या कर्तबगार नेत्याला मुख्यमंत्री पदी काम करण्याची संधी मिळावी.
यासाठी गेली पंधरा दिवस हा सागर पवार तरुण कार्यकर्ता नेरूळ ते तुळजापूर पर्यंत पायी प्रवास करत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सागर पवार यांनी नवी मुंबई ते तुळजापूर असा पायी प्रवास सुरू केल्याने या तरुण कार्यकर्त्याचे जागोजागी भव्य असे स्वागत केले जात आहे.
काटेवाडी (ता. बारामती) येथील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी इंदापूर येथे जाऊन केलेल्या स्वागतामुळे सागर पवार हे भारावून गेले असून काटेवाडीकरांचे त्यांनी आभार मानले व तुळजाभवानी चरणी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यासाठी मी आलो असून तुळजाभवानी देवी तारणहार असल्याने नक्की या माझ्या मागणीला यश मिळेल अशी माझी आशा आहे.