मुंबई – एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे 1 हजार उद्धव ठाकरे आणि 500 अजित पवारांपेक्षाही जास्त ताकदीचे त्यामुळे अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारची काळजी करु नये. असं प्रत्युत्तर भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांना दिलं आहे.
दरम्यान, राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. अजित पवार म्हणाले की, त्यांनी आमच्या सरकारमध्ये पाच मंत्री असल्याचं सांगितलं. त्यांचा आकडा चुकीचा आहे. सात लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती. यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती. त्या सातजणांमध्ये एकनाथ शिंदेही होते.