मुंबई – आमिर खानचा लाल सिंग चड्डा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. बॉलीवूडचा लाल सिंग चड्ढा चित्रपट हा ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाबाबतचे अनेक खुलासे केले आहेत.
आमिर खानने दोन वर्षांपासून चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास नकार दिला असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत सांगितले. अतुल कुलकर्णीने सांगितले की फॉरेस्ट गंपचे रुपांतर 2008 मध्ये आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर सुरू झाले. या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आम्ही सर्वजण आमिर खानसोबत गेलो होतो. त्याचवेळी आवडत्या चित्रपटाच्या विषयावर चर्चा सुरू झाली.
अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले की मी आणि आमिरने फॉरेस्ट गंपचे नाव घेतले. यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याच चित्रपटाची DVD पाहिली. माझ्याकडे मोकळा वेळ असल्याने मी हा चित्रपट पाहिला. या वेळी मला वाटले की जर चित्रपटात दाखवलेले सर्व काही भारतात असेल तर त्याचा काय परिणाम होईल. चित्रपट पाहताना मला वाटले की त्याच्या स्क्रिप्टवर काम का करू नये.
अतुल कुलकर्णी पुढे सांगतात की, मी 10 दिवसांत स्क्रिप्ट पूर्ण केली आणि पुढच्या 3 ते 4 दिवसांत दुसरा ड्राफ्टही पूर्ण केला. पण खरी मेहनत अजून सुरू व्हायची होती. स्क्रिप्ट घेऊन तो आमिरकडे जाताच आमिरने त्याला स्क्रिप्ट वाचण्यासाठी वेळ दिला नाही. अतुल कुलकर्णीने सांगितले की, आमिर खानने पहिली दोन वर्षे स्क्रिप्टही वाचली नाही. दोन्ही कलाकार एकमेकांच्या संपर्कातही होते. आमिर नेहमी म्हणायचा – ‘हो, वाचूयात.’
काही वर्षांनंतर अतुल कुलकर्णीने अभिनेता आमिर खानला विचारले की तो स्क्रिप्ट कधी वाचणार. यानंतर आमिर अतुलला म्हणाला- तू लेखक नाहीस आणि तू मला सांगतो की तू १५ दिवसांत फॉरेस्ट गंपची स्क्रिप्ट लिहिली आहेस. तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तू खूप वाईट लिहिलं आहेस असं सांगून मी तुला निराश करू इच्छित नाही.’ म्हणून मी स्क्रिप्ट ऐकत नव्हतो. मात्र, अतुलने आमिरला हे सांगून स्क्रिप्ट वाचायला लावली की वाचल्यानंतर त्याला आवडली नाही तर त्याने फेकून दिली तरी चालेल.