मुंबई – मुंबईच्या पालकमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात स्वतंत्र कार्यालय उभारले आहे असा आरोप विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज विधानसभेत केला. आणि हा चुकीचा पायंडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे मंगल प्रभात लोढा, जे मुंबई उपनगरांचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बीएमसीच्या एका केबिनमध्ये त्यांचे कार्यालय सुरू केले आहे.
पाटील म्हणाले, ‘मी या शहराचा पालकमंत्री होतो आणि नागरी संस्थेमध्ये कार्यालय उघडणे हे नागरी संस्थेच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. पालक मंत्री म्हणजे बीएमसीमध्ये निवडून आलेला प्रतिनिधी नाही असेही जयंत पाटील यांनी सरकारला बजावले. गरजेनुसार बीएमसी आयुक्तांना मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावले जाऊ शकते, परंतु महापालिकेतच पालकमंत्र्याचे कार्यालय उभारणे हा चुकीचा पायंडा आहे असे ते म्हणाले.