मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच “मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची” उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर कंगनाविषयी संताप व्यक्त केलाआहे. ‘ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस? उचलली जीभ लावली टाळ्याला…’ अशा शब्दांत रेणुका शहाणे यांनी कंगनाचे वाभाडे काढले आहेत.
Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It’s appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला 😡 https://t.co/FXjkGxqfBK
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
तसेच, मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील ट्विट करत कंगनाची कान उघडणी केली आहे. ‘या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…’ अश्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) September 3, 2020
अभिनेता सुभोध भावेनं सुद्धा कंगनाला खडेबोल सुनावले आहे. ‘ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!
ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा.
आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा! https://t.co/ITCY4kLNQB— Subodh Bhave (@subodhbhave) September 3, 2020
I love Mumbai !!!
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) September 3, 2020
Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020
मुंबई हिंदुस्तान है।
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 3, 2020
मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है।
सलाम करोगे तो सलामी मिलेगी। 🇮🇳
— sonu sood (@SonuSood) September 3, 2020
Mumbai meri jaan! 💜💜💜💜 #Mumbai #Karmabhoomi
— Swara Bhasker (@ReallySwara) September 3, 2020
काय आहे प्रकरण – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. “आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय” असं व्यक्तव्य कंगनाने काही दिवसांपूर्वी केलं होत. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं राऊत म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.