मुंबई – मेट्रो कारशेडच्या कामाला मागील नऊ महिन्यापासून स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं दिवसाला पाच कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, याबाबत त्यांनी चर्चा करणं गरजेचे आहे. असं वक्तव्य कांदिवली पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे काॅलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आमदार भातखळकर यांनी टीका केली.
मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला? @OfficeofUT pic.twitter.com/ThqdvBEMBq
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) October 11, 2020
“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्जात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.
भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांच्या सरकार नियुक्त समितीनेच मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आरे काॅलनीच्या जागेवरच होऊ शकते असे म्हटले होते, त्याशिवाय आमच्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या
समितीने देखील कारशेडसाठी आरे काॅलनीची निवड केली होती. असे भातखळकर म्हणाले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/E8qhmRTulz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020