नवी दिल्ली- कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात WHO ने जगात जागतिक महामारी जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या व्यवसायांवरसुद्धा या महामारीचा परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक गाडी ढासळली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना जागतिक बँकेने धक्कादायक इशारा दिला आहे. 2021पर्यंत सुमारे दिडशे मिलीयन जनतेला (अति गरिबीचा) दरिद्रीचा सामना करावा लागणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलं आहे.
कोरोनोत्तर काळात आपल्याला एका नव्या अर्थव्यवस्थेला स्विकारावे लागणार आहे. नव्या व्यावसायाच्या संधीदेखील शोधण्याची गरज भासणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मागील सहा महिन्यात 88 ते 115 मिलीयन लोकांना दरिद्रीचा सामना करावा लागला आहे, असा अंदाज मांडण्यात आला आहे. मात्र 2021 मध्ये ही संख्या वाढून 150 मिलीयनवर जाण्याची धक्कादायक शक्यता वॉशिग्टनच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांनी वर्तवली जात आहे.
Biennial Poverty and Shared Prosperity Report, अहवालानुसार, 2017 मध्ये 9.2 टक्के दराने रिग्रेशन दिसून आले होते. जगात कोरोना साथीचा रोग पसरला नसता तर, 2020 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण 7.9 टक्के राहिले असल्याची अपेक्षा आहे.