नवी दिल्ली – भारतातील दहा वर्षापुढील वयाच्या दर 15 जणांमागे एकाला करोनाची बाधा ऑगस्टअखेर होऊन गेली, असा अंदाज भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांन पित्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अहवालानुसार, ग्रामीण भागापेक्षा शहरी झोपडपट्ट्या आणि झोपडपट्ट्या नसलेल्या भागातही करोनाचा प्रसार अधिक झाला. अगामीं उत्सवाचा काळ आणि हिवाळा लक्षात घेता समुह एकत्र येऊ नयेत म्हणून राज्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
येत्या काही महिन्यात आपण मास्कवाली पूजा, मास्कवाली छट, मास्कवाली दिवाळी, मास्कवाली ईद यांची सवय आपण करून घ्यायला हवी. त्याची खबरदारी प्रत्येकाने बाळगायला हवी. त्यामुळे करोनाला रोखता येईल, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.