नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरक्षा रक्षकांसोबत त्यांचा अनेकदा आमना-सामना होऊन चकमकीही घडत आहेत. आज सकाळी श्रीनगरमध्ये अशीच एक चकमक झाली. यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
Jammu and Kashmir: Three terrorists neutralised in encounter with security forces in Batamaloo area of Srinagar
(visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1vo56F3Luh— ANI (@ANI) September 17, 2020
काश्मीर झोन पोलिसांनी याविषयीची माहिती देताना म्हटले, “श्रीनगरच्या बाटमालू भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडोतोड प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या ठिकाणी शोध मोहिम अद्यापही सुरु आहे.”