पुणे : सध्या करोनाचा संसर्ग सुरू आहे. करोनापासून बचावासाठी मास्कचा वापर केला जात आहे.
येत्या शनिवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाच्या रंगासारखा मास्क बाजारात आला आहे. हा मास्क वापरून नका, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे (पुणे जिल्हा) चे अध्यक्ष ऍड. फैय्याज शेख यांनी केले आहे. असे मास्क वापरणे म्हणजे राष्ट्र ध्वजाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. तिरंगा अविरतपणे फडकत राहावा, यासाठी अनेक जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे तिरंगा रंग असलेले मास्क वापरू नका. कारण, दुसऱ्या दिवशी हे मास्क फेकून दिले जातील. ते योग्य नाही, असे ऍड. शेख यांनी म्हटले आहे.