नगर – जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज संध्याकाळपर्यंत रूग्ण संख्येत 559 ने वाढ झाली. या दरम्यान आज जिल्ह्यातील 368 रुग्ण करोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या वगळून आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 165 इतकी झाली आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याची प्रमाण आता 62.05 टक्के झाले असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 559 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव, टाकळी फाटा, नगरमधील मुकुंदनगर, विनायकनगर, सिव्हील हडको, संजयनगर, पोलीस मुख्यालय, नगर तालुका, घोगरगाव, केडगाव, जेऊर, छावणी परिषद, शेवगाव, राहुरी, कर्जत, मलठण, नेवासा, खेडले काजळी, पारनेर, पिंपळगाव तुर्क, पारनेर श्रीगोंदा, उक्कलगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण 368 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये, मनपा 135, संगमनेर 32, राहाता 7, पाथर्डी 19, नगर तालुक्यातील 13, श्रीरामपूर 22, कॅन्टोन्मेंट 20, नेवासा 41, श्रीगोंदा 2, पारनेर 29, अकोले 11,राहुरी 1, शेवगाव 2, कोपरगाव 17, जामखेड 2, कर्जत 15, अशी रुग्णसंख्या आहे.