काठमांडू – नेपाळमधील सिंधुपालचौक जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे कमीतकमी दोन लोकांचा मृत्यू झाला असून 18 लोक हरवले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी याबाबत सांगितले आहे. पूर आणि भूस्खलन यामुळे नेपाळ आणि चीन दरम्यान ततोपानी-झांगमू बॉर्डर पॉइंटला जोडणारा महामार्ग खचला आहे.
सिंधुपालचौक जिल्हा प्रशासन कार्यालयाचे मुख्य जिल्हा अधिकारी अमेश कुमार ढकाल यांनी सांगितले की, बरहाबिसे नगर पालिका हद्दीतील 11 घरे वाहून गेल्यामुळे 14 लोक हरवले आहेत. तर 3 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर भोटेकोशी नगरपालिका हद्दीतील दोन घरे वाहून गेल्यामुळे चार लोक हरवले आहेत, तर 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, राजधानी काठमांडूला नेपाळ-चीन बॉर्डर पॉइंटला जोडणारा अरानिको महामार्ग कमीतकमी सात ठिकाणी खचला आहे. यामुळे चीनसोबतचा व्यापार काही दिवस बंद करावा लागेल. मार्च महिन्यात करोनामुळे दोन महिन्यांसाठी ततोपानी-झांगमू बॉर्डर पॉइंट पुन्हा सुरू करण्यात आला होता