मुंबई – पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक पुन्हा शिवबंधनात परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचे बोलले जात आहेत.
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावरुन मुख्यमंत्री नाराज झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली. त्यातच मंगळवारी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आज हे पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत.
शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात होते, म्हणून राष्ट्रवादीत घेतले. याबाबत अजित पवार यांना भेटलो होतो. आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी घरवापसी केली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची नाराजी ऐकली, ती दूर करण्याचे आश्वासनही दिल्याचे निलेश लंके यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान राखला आणि हे नगरसेवक शिवसेनेत परत आले आहेत, असे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर म्हणाल