मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर रोज नव्या वेगाने वाढत पुढे जात आहे. त्यात मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पर्यटन केंद्र बंद करण्यात आले आहेत.मात्र आता व्याघ्रप्रेमींना राज्य सरकारकडून चांगली बातमी देण्यात आली आहे. राज्यातील व्याघ्रप्रकल्प लवकरच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.
राज्यातील सगळे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी 1 जुलैपासून सुरू होणार, वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सगळे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले. दरम्यान,तब्बल तीन महिन्यानंतर राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह सगळे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य पर्यटकांसाठी सुरू होणार असल्याचे राज्य सरकारकडूनच सांगण्यात आले आहे.