नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वांच्या टीकेचे केंद्रस्थान बनलेल्या चीनने भारताला चक्क धमकी दिली आहे. चीनचा विरोध करण्यासाठी भारताने अमेरिकेला साथ दिली तर चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक, असे चीनने म्हटले आहे. याविषयीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.एकीकडे भारत आणि चीनदरम्यान सीमेवरीव तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून भारतविरोधी गरळ ओकताना दिसत आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्या परस्पर सहमतीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत, असे इंग्रजी वर्तमानपत्राने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण कमी होत असल्याच्या काही विश्लेषकांच्या वक्तव्यांचीदेखील यात प्रशंसा करण्यात आली आहे. दरम्यान, भारत आपल्या धोरणांचे पालन करावे आणि अमेरिकेपासून दूर राहावं, असे वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कमी झाल्याने दोन्ही देशांमध्ये भविष्यात आर्थिक आणि व्यापाराचे आदान प्रदान करण्याची संधी मिळेल. हे दोन्ही देशांच्या हिताचं ठरणार आहे. जर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम राहिला असता किंवा वाईट परिस्थितीत तो संघर्षात बदलला असता तर भारत चीन या दोन्ही देशांच्या संबंधांना पुढे नेण्यासाठी काही उरलं नसतं. जर राजकारणाचा अर्थव्यवस्था आणि व्यवहारावरील परिणाम पाहिला असता तर द्विपक्षीय व्यापारावर नक्कीच प्रभाव जाणवला असता कारण भारतातही चीनविरोधी भावना वेगानं वाढत आहेत, असे त्यांनी संपादकीयमध्ये नमूद केले आहे.