“आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे”
मुंबई – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच महाराष्ट्रामध्ये काल एकाच दिवशी ८३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची सकारात्मक बातमी आली. मात्र राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मृत पावलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर बोट ठेवत राज्य साकारवार निशाणा साधला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल राज्यामध्ये एकाच दिवसामध्ये ८३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी सादर केलेल्या याच आकडेवारीवर टिपणी करताना फडणवीस यांनी, ‘आपली लढाई कोरोनाशी आहे आकडेवारीशी नाही’ असं ट्विट करत काल राज्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ११६ बळी गेल्याचे निदर्शनास आणून दिले.
फडणवीस यांनी याबाबत एक ट्विट शेअर केलं असून या ट्विटद्वारे त्यांनी, ‘काल (दि. २९ मे) एकाच दिवशी ८३८१ रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक ११६. रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याचा घाईत त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढतेय्. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करा, ही पुन्हा विनंती!’ असा संदेशही दिला आहे.
काल (दि. 29 मे) एकाच दिवशी 8381 रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक 116.
रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याचा घाईत त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढतेय्.
आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करा, ही पुन्हा विनंती!