सातारा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौध्द समाज ,बहुजन समाज, शासन मोठ्या उत्साहात साजरी करते.यावर्षी देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लॉक डाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि.14 रोजी होणारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरा घरात साजरी करून कायद्याचे पालन करा,हीच आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.
देशभरात दरवर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.यावर्षी करोनाच्या संकटामुळे सर्वांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व कायद्या वर आपन लॉकडाऊनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करित आहोत. कायद्याचे पालन करणे ही भीम(आंबेडकर) अनुयायांची जबाबदारी आहे.कायद्याचे पालन करू जयंती साजरी केल्याचे सार्थकी लागणार असून हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. जिल्हात एकत्र येवून स्पिकर,मनोरंजन, किंवा कुकल्याही प्रकार कार्यक्रम आयोजित करू नयेत,असे आवाहन ओव्हाळ यांनी केले आहे