सोमेश्वरनगर (वार्ताहर): कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी भारतासह जगभरातील देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे आपणही सरकारला सहकार्य करीत येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. हे राष्ट्र आणि मानव कल्याणासाठीही आवश्यक आहे. म्हणून आंबेडकर जयंतीचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम संघटनांनी आयोजित करू नये. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी आपापल्या घरातच कुटुंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे आवाहन बारामती तालुक्यातील वडगांव निंंबाळकर ठाण्या हद्दीतील येणाऱ्या सर्व गावांला केले आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तालुक्यातील सर्व गावांमध्ये दरवर्षी कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले जाते. परंतु यावर्षी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी घरातच कुटंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे सर्व गावांमधील भिम सैनिक ; संघटना यांना उद्याच्या जयंतीच्या शुभेच्छा देत वडगांव निंंबाळकर (ता बारामती) ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी विनम्र आवाहन ही केले आहे.