आळंदी -देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्याच प्रार्श्वभूमीवर पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 30 तारखेपर्यंत बंद राहणार असल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
त्याच धरतीवर आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिरही बंद ठेवण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे, असे मंदिर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
माउलींचे नित्योपचार पूजाअर्चा सुरू राहणार असून भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे केले जाणार असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.